Saturday, April 6, 2013

बिल्ली,बिपाशा आणि आपण



बिल्ली,बिपाशा आणि आपण

सौ चुहे खाके बिल्ली हजलाच कां गेली,या प्रश्नाचं उत्तर विश्वकोशाच्या एकाही खंडात मिळत नाही.ब्रिटानिया एनस्लायकोपीडिआवाल्यांना स्वत:च्या अपडेशनचा फार अभिमान असला तरी लॅटेस्टतम ब्रिटानिकामध्येही याचं उत्तर मिळत नाही.म्हंटले,गुगलून बघावे तर तेथेही याचं उत्तर नाही.मुळात आडातच नसेल तर पोहऱ्यात कुठून यावयाचे,हेच खरे.
   ही जी बिल्ली आहे तिला हरीद्वारला कां जावे वाटलं नसेल?हा आम्हास प्रश्न पडला.या प्रश्नाचं उत्तर शोधताना या बिल्लीला हजलाच कां जावं वाटलं हा प्रश्न मिळाला.हजलाच गेलेली बिल्ली ही सौदी अरेबियामधील किंवा आखाती देशातील असण्याची शक्यता नाकारता येत नाही.कारण ही बिल्ली आर्यावर्तातील असती तर तिला रामेश्वर किंवा कन्याकुमारी किंवा अमरनाथला जावं वाटलं असतं.ही फक्त शक्यता झाली.आर्यावर्तातील बिल्लीने हजला जाऊ नये,असं काही व्यासमुनिंनी महाभारतात लिहून ठेवलेलं नाही.किमान जर्मनीच्या मॅक्समुल्लर साहेबांना तरी तसे आढळलेलं नाही.हे मॅक्समुल्लर साहेब महाभारताचे गाढे अभ्यासक समजले जातात.त्यांच्यामुळेच महाभारताची ओळख जर्मनीला आणि नंतर यथावकाश जगाला झाली अशी अफवा कम वदंता दशकानुकशे आर्यवर्तात लोकप्रिय आहे.
   बिल्ली आर्यवर्तातीलही किंवा अरबस्थानातील किंवा पृथ्वी लावरील कुठल्याही भूप्रदेशातील राहू शकते.बिल्लींना व्हिसा आणि पासपोर्टची अजिबातच गरज नसल्याने त्या इकडून तिकडे किंवा तिकडून इकडे सुखनैव जावू शकतात.9/11 च्या प्रकरणानंतर सुध्दा एकाही बिल्लीला जगातील कोणत्याही विमानतळावर अडविल्याचं कानी आलेलं नाही.
   अशा या बिल्लीला सौ चुहे खाल्ल्यानंतर हजला जावेसे वाटले पण व्हॅटिकनला कां नाही,हा प्रश्न मनी आला तरी तो वरणातील झुरळासारखाच बाहेर काढणेच इष्ट ठरावे.आपण काही कुणाच्या मूलभूत स्वातंत्र्यावर गदा आणू शकत नाही.प्रश्न असा पडतो की या बिल्लीला 100चुहेच खाल्यानंतर कां जावेसे वाटले.111 पर्यंत तिने वाट कां बघितनर नाही.किंवा मग 49 चुहे झाल्यावरही तिला उपरती कां झाली नसावी.याही प्रश्नांचं उत्तर केवळ त्याच बिल्लीलाच ठाऊक असणार.शिवाय 100 चुह्यांचा आकडा आला कुठून?हेही महत्वाचं.त्याची नोंद बिल्लीचे पीए करुन ठेवत होते की चुह्यांमधील कोणी हुषार आणि स्मार्ट चुहा करुन ठेवत होता ? हा आकडा 1000 सुध्दा राहू शकतो की.तसा तो असेल तर ही बिल्ली भीमपराक्रमीच ठरते.तिचा हा पराक्रम कमी लेखण्यासाठी हा आकडा हजारवरुन शंभरावर आणण्यात तर आलेला नाही ना !असे असेल तर हे मोठेच षडयंत्र दिसते.ते चुह्यांनी रचले की त्यांना यासाठी कुणी प्रवृत्त केले ? याचा शोध कसा घ्यायचा ?
   उलटे सुध्दा राहू शकते.सौ चुहैंच्या ऐवजी एकच चुहा असू शकतो.पण बिल्लीने आपल्या कम्युनिकेशन स्कीलमधून तो आकडा सौ केला असू शकतो.तसे करुन आपण किती भीमपराक्रमी आहोत असेही तिस सिध्द करावयाचे असू शकते.म्हणजेच याबाजूलाही षडयंत्र असू शकते.गंमत म्हणजे दोन्ही बाजूंना षडयंत्राची कल्पना नसावी.समजा असेल तर बिल्ली आणि चुह्यांची गोलमेज शिखर परिषद होऊन सन्मानजनक तोडगा काढलेला असावा.म्हणजे बिल्लीने हजारावर दावा करावयाचा नाही आणि चुहै यांनी एकवर अडून बसावायाचे नाही.त्यातून 100 हा सन्मानजनक आकडा निघाला असण्याची दाट शक्यता आहे.मात्र याचाही शोध घ्यायचा कसा आणि कशासाठी.कारण या बिल्लीने हजला जाऊन आपल्यावर काही उपकार केले नाहीत.खर तर त्याची चिंताही करण्याची आपणास गरज नाही.ही बिल्ली सॅनफ्रँन्सिस्को किंवा हडसननदीच्या तिरी गेली असती तरी तरी सूर्य पश्चिमेलाच मावळला असता आणि कोंबडा पहाटेच आवरला असता.त्यामुळे सांप्रतकाली कुमारी असणाऱ्या बिपाशा बसू या हरीद्वारला जाणार असं जे परवा परावा छापून आलय ना,त्याने उल्हासित होण्याचं,आनंदानं आणि अभिमानानं न्हाऊन जाण्याचं कारण नसावं.बिपाशा हरिद्वारला जाते.बिल्ली हजला जाते.आणि आपणही हळूच शिर्डीला जातोच की..
000

No comments:

Post a Comment